Monday, December 27, 2010

द भालेराव---१४
केशवराव देशपांडे---मराठवाडयाचे साने गुरुजी !
दिलशाद टॉकीज हैदराबादची सुलतानबाजारातली गजबजलेल्या वस्तीतली टॉकीज. मॅनेजरच्या खोलीला त्याकाळातले प्रसिद्ध अर्धे स्प्रिंगचे दार. त्यात मला ( वय वर्षे १०) खालून केशवराव काका खुर्चीत बसलेले दिसले. मागून माझे काका लोक मला ढोसत होते की आत जा व चिठ्ठी दाखव. वडिलांनी चिठ्ठी दिलेली होती, "मुले सिनेमाला येत आहेत, कृपया त्यांना सोडावे !" सिनेमाला चिक्कार गर्दी. लोकांची मॅनेजरच्या खोलीत चांगलीच वर्दळ, मागाहून माझ्या काका मंडळींचे ढकलणे. मी कसाबसा आत जातो. काही न बोलता केशवराव काकांच्या हातात चिठ्ठी देतो. ते म्हणतात, "अरुण ना तू. थांब हा थोडं, किती जण आहात ? " मग बराच वेळ आम्ही बाहेर थांबतो. मधनं मधनं आतून कळत राहते की इंडियन न्यूज रिव्ह्यू सुरू झालाय, गर्दीची वर्दळ वाढतेय, आमची चलबिचल. तेव्हढ्यात केशवरावकाकांचे बोलावणे येते, एका माणसाबरोबर ते आम्हाला आत सोडतात. हुश्श ! सिनेमा सापडला ! खरे तर चिठ्ठीने फुकट सिनेमा पाहतोय ह्याचे आम्हालाच कानकोंडे वाटत असायचे पण केशवरावकाका सर्व परिस्थिती जाणून अतिशय मृदू हाताळणीने काहीही दडपण आमच्यावर येऊ द्यायचे नाहीत. दुसर्‍याचा इतका विचार करणारे लोक खरच विरळा !
त्यानंतर ते मराठवाड्यातच आले. पैशाचे सर्व व्यवहार त्यांच्याकडे असत. आमच्याकडे घरी पैशाची कायमच चणचण व आणिबाणीचे प्रसंग सारखे येत. मग वडिलांना हातउसने उचल घ्यावी लागे. कित्येकवेळा आमची आईसुद्धा केशवरावकाकांना शब्द टाकायची. सगळ्यांचीच ओढाताण असायची. त्यात केशवरावकाकांना खरे तर कडक होणे व पैसे नाकारणे काही जड गेले नसते. पण त्यांचा स्वभाव इतका मुलायम व संवेदनशील की ते पैसे मागणार्‍या आम्हा मंडळींना कधीही हिडीसफिडीस किंवा कमी लेखत नसत. हे फार मोठ्या मनाचे लक्षण आहे हे आता क्षणोक्षणी ध्यानात येते. म्हणूनच तर मला ते नेहमी मराठवाड्याचे साने गुरुजीच वाटत आले आहेत.
मी तर त्या काळात वडिलांबरोबर त्यांच्या भावाकडेही दादरला जात असे. तेही खूप माया करीत. सर्व कुटुंबच मोठे मृदु स्वभावाचे व परोपकारी वागणारे. मराठवाड्यात कित्येक वेळा वादळी चर्चा होत, बोलाचाली होई. पण मी कधीही केशवरावकाकांना त्यांचा मृदूपणा सोडलेले पाहिले नाही. इतका सोज्वळ मृदू स्वभाव सर्व परिस्थितीवर मात करीत नजरेत भरून राही.
जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला, असे साने गुरुजींचे वचन आहे, ते खास केशवरावकाकांसाठीच जणुं केले असे वाटते. मराठवाड्याच्या ह्या साने गुरुजींच्या आत्म्यास शांती मिळो, कुटुंबियास त्यांच्या पश्चात कालक्रमणा करतांना धैर्य मिळो, हीच ईच्छा !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Wednesday, December 15, 2010

मोनालिसाचे कोड !
चित्रकलेच्या जगात मोनालीसा ह्या लिओनार्डो-दा-व्हिन्सी च्या चित्राचे खूपच कोडकौतुक झालेले आहे, होतही आहे. त्यावर नुकतेच गाजलेल्या "दा व्हिन्सी कोड" कादंबरीत भलभलते अर्थांचे इमले चढवलेलेही आपण पाहिले. इतके करूनही मूळ जिज्ञासा तशीच राहते की कोण असेल ही बाई व ती काय सांगत असेल बरे ?
तर चित्रकलेतले संशोधक अव्याहतपणे हा ध्यास बाळगून राहतात व निरनिराळे तर्क लढवतात. असाच एक नुकताच प्रसिद्ध झालेला तर्क आहे की मोनालीसाच्या चित्रात तिच्या डोळ्यात म्हणे बारीक बारीक अक्षरे दिसली, जी एक प्रकारे ह्या चित्राचा संदेश वा कोड ( गुप्त संदेश) असावा. डोळ्यात सूक्ष्मदर्शक भिंगाने म्हणे काही अक्षरे दिसली आहेत. एका डोळ्यात दिसलीत : एल व्ही. तर तज्ज्ञांचे म्हणणे की ही असावीत लिओनार्डो व्हिन्सी ची आद्याक्षरे. दुसर्‍या डोळ्यात दिसताहेत : सी, ई किंवा बी. तर काही जणांना ती दिसताहेत 72 किंवा एल व 2 अशी. आता ह्याचा मात्र काही बोध होत नाहीय.
चित्रकलेत चित्रकाराने आपले नाव चितारणे आज तरी सार्वत्रिक आहे. काही काही चित्रकारांच्या फर्ड्या सह्या तर त्यांच्या चित्रांपेक्षाही ज्यास्त बहारदार वाटतात. शिवाय आपण बर्‍याच सहलीच्या ठिकाणी असलेल्या रेघोट्या ( जसे रमेश लव्हज सीमा वगैरे ) पाहतो त्यावरून चित्रकाराला आपले नाव लिहिण्याची उबळ येणे हे ज्यास्त साहजिक वाटते. तेव्हा एल व्ही हे चित्रकाराचे नाव असूही शकेल. पण बाकीचे 72, एल 2, किंवा बी ह्यांचे काय कोड असेल ?
चित्रकलेत पोर्ट्रेट ह्या चित्रांना नावे देण्याची प्रथा नाहीय. शिवाय पूर्वी व अजूनही कित्येक पोर्ट्रेटस ही व्यावसायिक मॉडेलस ना पुढे ठेवून काढलेली असतात. जे.जे. स्कूल मध्ये तर असे ऐकले आहे की नग्न चित्रे काढण्यासाठी तशा मॉडेल्सही असतात. पण त्यांची नावे देण्याचे चित्रकाराला प्रयोजन नसते. ( त्यांना पैसे ठरल्याप्रमाणे दिले तरी पुरेसे असते.). तेव्हा दुसर्‍या डोळ्यातली अक्षरे ही काही त्या चित्रातल्या व्यक्तीचे नाव नसणार. काही जणांचा तर कयास आहे की समलिंगी संभोग करणार्‍या दा व्हिन्सीने एखाद्या छक्क्याचेच हे चित्र काढलेले असणे ज्यास्त संबवनीय आहे.
आजकाल चित्रांना नावे देण्याची प्रथा आहे. जसे हुसेनने काढलेल्या एका नागड्या बाईच्या चित्राला त्याने सरस्वती असे नाव दिलेले आहे. पूर्वीच्या चित्रात प्रसिद्ध नाव आहे "द लास्ट सपर" किंवा "मेरी". तसे हे चित्राचे शीर्षक नसावे.
टॉलस्टॉयने पूर्ण आयुष्यभर कला म्हणजे काय व ती का असते त्याचा पाठपुरावा केला. त्याला वाटले की कला म्हणजे भावनेची परिपूर्ण उत्क्रांती असते, आणि कला सगळ्यांना उपलब्ध असून ती माणसाला उच्च अनुभव देते. आजकालचे चित्रकार जी व जशी चित्रे काढतात व त्यांना नावे देतात त्यावरून तर वेगळाच संशय येतो की हे काही खरे नसावे. पूर्वी जसे संस्कृतमध्ये निरनिराळे न्याय असायचे ( जसे काकतालीन्याय---म्हणजे टाळी वाजवायला व त्यात कावळा सापडायला एकच वेळ व्हावी, किंवा अंधहस्तीन्याय--म्हणजे सात अंधळ्यांना हत्तीची वेगवेगळी रूपे जाणवावीत व तीच म्हणजे हत्ती असे त्यांना वाटावे वगैरे ) त्याप्रमाणे हा एक घूणाक्षरन्याय असेल. म्हणजे एखाद्या किड्याने लाकडात कोरावे व ती नक्षी आपल्याला अक्षर वाटावे. ( असे व्यवहारात प्रत्यही घडते. उदा: ईदच्या बकर्‍यावर अल्ला अशी अक्षरे उमटलेली भासावीत किंवा पावसाने डागाळलेल्या भिंतीवर साईबाबाचे चित्र दिसावे. )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

arunoday zala----13

Monalisa's new code !

The portrait of Monalisa by Leonardo-da-Vinci is a very pampered piece of art and it continues to draw imagination of the critics and researchers. In the recent famous novel of "Da Vinci Code" it has stretched all meanings to its maximum and still people keep researching meaning beyond what appears in the portrait.
While looking for meaning and code of this famous portrait in the Louvre in Paris the researchers have looked for a new code in the eyes of the portrait. They have found very minute letters in her eyes and they feel that this could be the code. With modern magnifiers they have found in one eye, letters : L, V. This they presume could be the initials of the artist Leonardo-da-Vinci. And in the other eye they have found letters: C and E or B or number 72 or L and 2. They are still deciphering these letters.
What code these letters must be containing ?
The presumption of L V being initials of the artist seems quite plausible. We still this tendency among the juveniles when they scribble "Ramesh Loves Seema" or some such names when we visit most of the historical places. And this seems to ba tradition also amongst most of the modern artists by putting their signatures in the paintings. In fact some of the artist's signatures look more impressive than their paintings.
Some of the artist do give titles to their paintings. For example the famous painting of M.F.Hussein of a naked lady bears the name of Saraswati, the Hindu Goddess. ( And because of such paintings Hussein has preferred Qatar to India ).Even in the oldern days we had titles like "the last supper" or "Mary" for the famous paintings.
But it seems unlikely that portraits are given titles. Most of the famous portraits don't have their person's names. In fact it is said that even now they employ professional models at JJ School of Art for portraits and nudes. They need not be given names . ( If they pay as per terms , it should be enough !).
What could be the meaning of these letters then ? Tolstoy had wondered, throughout his life, as to what could be the meaning of Art and what does it do ? He attempted to say "the evolution of feeling proceeds by means of Art; art is accessible to all men ; art and only art can cause violence to be set aside !"
But it also could be, as explained in some old Sanskrit scriputures by name "Nyaya". The famous examples are : say- "andh-hasti-nyaya" meaning seven blind men feeling an elephant and believing that as the reality or "kak-tali-nyay" meaning that by chance you should catch a crow in your hands while you were just clapping hands. They also have another variety called Ghoonakshar-nyaya, meaning a worm boring in the wood should appear as some design and it should appear as letters to us.
We are replete with incidents in actual life when this happens. It happens when we notice that the sacrificial sheep at the time of Eid is found to have some letters looking like "Allah" or on a rain soaked wall suddenly throws up a picture looking like Sai-Baba.
So the code could be just some worm's doing ?

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Saturday, November 27, 2010

द भालेराव---१२

माझी ई-फजीती !
मला मी ब्लॉग्ज लिहितोय याचा काय आनंद ! ते लोक वाचतातही असा माझा गोड समजही झाला होता. मी माझ्या ब्लॉगवर एक गुगल गॅजेट जोडले होते. भेट देणार्‍यांची मोजदाद करणारे. त्यात कोण वाचतय त्याचे लोकेशन एका नकाशात येते. त्यावर एक जण जपान मधून माझा ब्लॉग वाचतोय हे बघून तर मला गलबलूनच आले ! आणि हे सर्व होत असताना काल माझी चक्क ई-फजीती झाली ! आपली एरव्ही होते ती साधी नुस्ती फजीती तर संगणकावर होते ती ई-फजीती !
माझा चुलत भाऊ कॅनडाला असतो, श्री नाव त्याचे. व्यवसायाने माननोपचारतज्ञ आहे. त्यामुळे त्याला मी कधी कधी अवघड असे प्रश्न विचारत असतो व त्यालाही त्यावर फुकटचे भाष्य करायला आवडते. तर असेच पैसे कमावण्यावर विषय निघाला व मी सुचवले की आपण उगाच पैसे कमी पडतील ह्याची काळजी करत राहतो व मरताना आपल्याकडे घर वगैरे मिळून उरलेली संपत्ती असते काही कोटीची ! म्हणजे आयुष्यात एकूण खर्च होतो त्याच्या दुपटीने शिल्लकच राहते. आणि ह्या पुष्ट्यर्थ मी साधारण खर्चाचा अंदाजही दिला होता. त्यापुढे जाऊन मी असे म्हटले की माझे वडील ( आम्ही त्यांना अण्णा म्हणत असू ), मात्र त्यांच्या ध्येयवादापायी सर्व आयुष्यभर अजिबात काही न कमावता राहिले ( तरी पण त्यांच्या पश्चात त्यांचे घर दीड कोटीचे उरलेच !). हे त्यांनी ज्या ध्येयवादापायी केले त्यात एवढी शक्ती होती का की ते प्रवाहाविरुद्ध जाऊन अजिबात काही ऐहिक संपत्ती न कमावता राहू शकले. तर मी त्याला विचारत होतो की अशी शक्ती ध्येयात असते की त्या त्या व्यक्तीच्या खंबीरपणात असते ?
मी हा ई-मेल आमच्या इतर नातेवाईकातही फिरवला. मला वाटत होते की काय अगदी वैचारिक वादविवाद मी सगळ्यांना घडवून आणतोय !
ह्यावर मला उत्तरात एक ई-मेल आला. त्यात पाठवणार्‍याचे नाव होते : अण्णाबेबी ४यू३. आता माझा चुलत भाऊ कधी कधी फिरकी घेण्याच्या मूड मध्ये आला की असे काही तरी टोपणनावाने असे करतो, असे वाटून त्यानेच हा पाठविला असेल असे मला वाटले. आलेल्या टोपणनावी ई-मेल मध्ये अजून म्हटले होते की इथे थंडी आहे. तुमच्याकडे सूर्य काय म्हणतोय वगैरे. शिवाय माझा अरुणोदय-झाला हा ब्लॉग वाचलाय असेही लिहिले होते. शेवटी म्हटले होते की तुझे उत्तर आल्यावर मी माझे फोटो पाठवीन.
तो कॅनडात आहे व तिथे थंडी असते, त्याने अगोदरही काही फोटो पाठविले होते ह्यावरून तर हा त्याचाच मेल ही माझी खात्री झाली. मी लगेचच एक उत्तर पाठवले त्यात त्याच्या विनोदबुद्धीची तारीफ केली होती. आणि मी मग विसरूनच गेलो.
आज पाहतो तर त्याच अण्णाबेबीचा ई-मेल आलेला. मी अधीरतेने तो उघडला. तर काय आश्चर्य ! त्यात एका काळ्या आफ्रिकन तरुण मुलीचा बिछान्यावर पहुडलेला आकर्षक फोटो व माहीती की आफ्रिकेतल्या कुठल्यातरी निर्वासित केंद्रावर आहे व तिचे नाव ऍना आहे. आणि बरेच काही.... जे तुम्हाला समजलेच असेल !
मी समजत होतो माझे वडील अण्णा व त्यांची मुले आम्ही अण्णाबेबी व ही निघाली ऍना आणि ती ही अशी ! काय ही ई-फजीती ! नशीब दारात नाही येऊन धडकली !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


The Bhalerao---12

My E-Embarrassment !
I was so proud that even at the age of 68 , I am so current with the world trends, I write blogs etc.! And I also was under the impression that people do read such blogs and they like it too !
On my blogs, I had attached a google gadget called visitor counter which gave me the number of visitors and also their location on a world map. People from Japan were reading my blog and I felt nostalgic about the same.
One of my cousins stays in Canada, ( Shree ) and he is psychiatrist by profession. He is fond of discussing difficult subjects on e-mail and I also indulge with him on many ocassions. Once I wrote to him that we unnecessarily worry about making money in our lives and end up leaving behind a large sum unused. I had given a rough estimate of average man's expenditures and shown that we end up leaving behind more than double of what we spend in our lifetime. Then I commented on an unusual example of my father ( we called him Anna ) , who never followed this common money-making trend and lived his life with lot of principles. I asked him whether this going against the trend comes from the strength inherent in any ideology or does it come from one's commitment ? And I was expecting a psychiatrists babble on this....
But I received an email under a psyudoname : Annababy 4u3. I thought he was being mischievous and witty and calling me a baby of my father Anna. He also said it is very cold there and that he has read my other blogs etc. Last time he was to send me some photos but he had forgotten about it. But in this email he said he will send the photos after he receives the reply. I thought it was a bait for my reply !
And lo and behold , today I received an email from Annababy. I also received a photo of a young African lady in a pose reclining on the bed. And she said she is from re-habilitation centre somewhere in Africa and her name is : Ana !
I have been embarrassed many times before but this was my first E-embarrassment !
Arun Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Friday, November 19, 2010

द भालेराव--११
लाचलुचपत का असते ?
बहुतेक उदाहरणात राज्यकर्ते जमीनी, घरे, कंपन्या, ह्यात सत्तेचा फायदा घेऊन पैसे करतात असे दिसते. अशोक चव्हाणांना चार नातेवाईकांच्या नावावर घरे असावीत असे का वाटावे ? किंवा कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलांनाच जमीनी का देवव्यात ?
इतरांचे राहू द्या. आपण आपल्यावरूनच बघू. आपण आपले घर शेवटी कोणाच्या नावे करू ? तर मुलांच्याच ना ? काही जण देऊन टाकतात धर्मादाय ते विरळाच असते. साधारणपणे प्रवृत्ती असते, मालमत्ता जी काही शिल्लक राहते ती मुलांना द्यायची. असे आपल्याला का वाटते ? कित्येक कुटुंबात वारस नसतो तेव्हा ते दत्तक घेतात पण मालमत्ता दत्तक मुलांनाच देतात. जसे : टाटा उद्योगसमूहात किंवा बजाज समूहात झालेले आहे. आपल्याच कुटुंबियांचा असा भरवसा आपल्याला का वाटतो ? मुले भांडतात, बंड करून वेगळे होतात तरीही ?
आपल्याच मुलांबद्दल एक प्रकारची माया असते. ते आपलाच अंश आहेत अशी एक धारणा असते. तसे बाहेरच्यांविषयी वाटत नाही. हे खरेच नीट पटवून घ्यायचे असेल तर क्षणभर एक उदाहरण घेऊ: समजा पुनर्जन्म ही गोष्ट खरी आहे असे धरून चला व त्या प्रमाणे तुम्हाला जर विचारले की पुढचा जन्म कोणाच्या उदरी घ्यायचाय ते सांगा ! तर आपण बहुतेक सर्व चांगली प्रलोभने ( जसे: अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, माधुरी दिक्षित, किंवा नोबेल पुरस्कार वाले ) सोडून विचार करायला लागतो ते मुलाच्या किंवा मुलीच्या घरांचा किंवा जवळच्या नातेवाईकांचा. त्यांच्याबद्दलची मायाच आपल्याला दिलासा देत असणार की ह्यांच्याकडेच पुन:र्जन्म घ्यावा असा.
माया अशी आपल्याला आपल्याच घराण्याचा विचार करायला भाग पाडते !
मग असेच लाचलुचपत घेऊन मिळवलेल्या संपत्तीबद्दल वाटायला लागते व माणसे जमीनी, घरे, पैसा अडका, कंपन्या, सत्तापदे ही आपल्याच मुलांना वाटतात. उरते ते मग आपलाच डिएनए जे बाळगताहेत त्यांच्यासाठी सोडीत आपण जातो !
अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

The Bhalerao--11
Why Corruption ?
Most of the politicians are found to have multiple houses, lands, moneys, companies in the name and for the sake of their children or the near and dear ones. When Chief Minister of Maharashtra was found to be corrupt, it was by means of four flats for his nearest relatives. Similarly the Karnataka Chief Minister gave his sons lands and houses.
Forget politicians . Let us take our own example. For whom would we leave our property, money and house to ? Most of the commoners would leave it to their children. There are very few exceptions who donate their property to charity or to worthy causes. Most of us, leave it to our own children. Some very well known families had no heir of theirs but they still left it to their adopted children. Despite our children turning out to be rebels, quarrelling with us and going their way, still we leave all the collectons to them. Why do we do this ?
Somehow the predominant feeling we have about our children, especially when the bequething time comes, is that they are a part of us, belong to us. We cannot enlarge our hearts to feel the same way about the outsiders, aquaintances , or the society at large.Let us check whether we do this by taking a simple example. Suppose for a moment that the doctrine of re-birth may be true. And suppose accordingly we are asked where would we take our next birth ? Dropping all lucrative alternatives ( like say, in the families of Amithabh Bacchan, or Aishwarya Rai, or Madhuri Dixit , or some Nobel laureates ) we are likely to think of our own children or the nearest suitable relatives. This Mayaa forces us to think about our own DNA carriers as our most near & dear ones and accordingly we leave all our wealth to them. This Mayaa forces us to be corrupt !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Saturday, August 28, 2010

द भालेराव----११

घसरती पॅंट ! सॅगिंग !

फॅशनच्या युगात काय काय बघायला मिळेल त्याचा काही नेम नाही. इथे सध्या एक विचित्रच फॅशन पहायला मिळते आहे. नेहमीचीच जीन, पण पोरे ती इतकी खाली नेसतात की ती सारखी घसरत असते व एका हाताने धरून ठेवायला लागते. बहुतेक करून आफ्रिकन-अमेरिकन पुरुष ही फॅशन करताना आजकाल मॉल्स मध्ये दिसतात. इथली हायस्कूल ( ११वी,१२वी ) ची मुले असल्या पॅंटी घालून कशी काय शाळेत वावरतात हे समजायला अवघडच आहे. आता आपल्याकडेही ही फॅशन येईलच.

गुजरातीत एक वाक्प्रचार आहे, "धोती फाडके बनाया रुमाल", म्हणजे मराठीत कांसेचे नेसते डोक्याला गुंडाळल्यासारखाच हा प्रकार आहे. तुकाराम महाराज चांगल्या लोकांची भलामण करू, पण नाठाळांना बदडून काढू असे म्हणताना म्हणतात : "भले तरी देऊ । कासेची लंगोटी । नाठाळाचे माथा । हाणू काठी । " त्यावरून त्याकाळी लंगोटी नेसत असत ही बातमी आपल्याला लागते. लंगोटी हा प्रकार आतल्या चड्डीचा, अगदी चिंचोळी चिंधी असा. पण तो फक्त आखाड्यात किंवा क्वचित प्रसंगी न्हाणीघरात दिसत असे. बाहेरचीच पँट अशी ढिल्ली ढाली घसरती नेसण्याचा हा प्रकार नवीनच म्हटला पाहिजे.

हा प्रकार घालणार्‍यांना काही तरी अघटित करण्याचे समाधान देत असेल, पण त्यात काही आकर्षकपणा मात्र सुतराम दिसत नाही. उलट आतली अंडरवेअर दिसत असल्याने हे दृश्य ओंगळवाणे ज्यास्त दिसते. पण खोडकर मुलांना तेच हवे असते, जसे आजकाल ती एखादी गोष्ट चांगली आहे हे म्हणताना ते म्हणतात की किती "डिसगस्टिंग !"

ह्यांच्या पॅंटी लवकरातल्या लवकर घसरो व ......!

अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

The Bhalerao----11

Sagging Jeans, Sagging Fashion !

In fashion-world you are not shure what could be next ! Nowadays , male kids here, mostly African-American, in malls, are seen to be holding their pants ( jeans ) up with one hand and walking like a rap artist. If these grown-up kids ( 11th, 12th graders ) wear such sagging jeans in High School, it must be a very odd sight for the school atmosphere.

The sagging jean is to be worn so low that the underwear should be visible. In distant past we might have seen people wearing very scant dresses or only a strip like thing ( langot ). But the civilisation has made much progress thereafter and now wearing such jeans, though in the name of fashion, is very confusing.

If the guys wearing these jeans imagine that it could be adding to their sex-appeal as the underwear is revealing it will only show their bankruptacy in aesthetics. It definitely does not add to any appeal but makes the onlookers disgusting.

But these days kids apply a word and mean something else. Like when they like something very much they are likely to say "it is disgusting !" So, whatever their intended meaning, disgusting it is !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Thursday, August 19, 2010

द भालेराव---१०

आधी अंडे का कोंबडी ?

अमेरिकेची सुधारण्याची किंवा बदलण्याची काही लक्षणे दिसत नाहीत. ह्या आठवडयात आता अंडी बाजारातून मागे घेतली जाताहेत, कारण काय तर साल्मोनेल्लाची त्याला बाधा झालीय व लोक ती खाल्ल्याने आजारी पडताहेत.

एखाद्या विषयाचा काथ्याकूट नाही केला तर मग ती अमेरिका काय म्हणायची ? आता इतक्या साध्या विषयावर उपाय, अपाय वगैरे असे कितीसे असणार असे आपल्याला वाटते न वाटते तोच वर्तमानपत्रांचे रकाने तत्परतेने सांगतात : प्रोपोझिशन-२ अन्वये कोंबडयांची खुराडी मोठी व वातानुकूलित न केल्याने हे दुष्परिणाम होत आहेत. आपल्याकडच्या मनेका गांधी सारख्या एका संस्थेचे ( ह्युमेन ट्रीटमेंट फॉर फार्म अ‍ॅनिमल्स ) म्हणणे असे की कोंबडीला खुराडयात ताणून उभे राहता येऊन, चक्क गिरकी घेता यायला हवी, एवढी प्रशस्त खुराडी हवीत. कोंबड्यांना दाटी झाली की अंडी सुख देणारी होत नाहीत.

आता पोल्ट्रीवाले म्हणतात की एवढे करायचे तर खर्च कोण देणार ? शिवाय ही पहा आमची नवी प्रशस्त वातानुकूलित खुराडी, पण कोंबड्या बघा कशा एकत्र घोळका करून कोपर्‍यात बसताहेत. मग अलीशान खुराड्यांचा काय उपयोग ? आणि सगळ्या जगातल्या कोंबड्यांना कोंडवाडे चालतात, मग आमचीच अंडी दु:खी कशी ? सगळ्या जगाचीच खुराडी मोठी होऊ द्यात, मग आम्ही करू.

काही मनेका गांधी वाले लोक इथे म्हणताहेत की खरे तर कोंबड्यांना मुक्त चरू द्यावे, त्यांना मोकळेच ठेवावे. ह्यावर पोल्ट्रिवाले म्हणतात, अहो अशाने त्या एकमेकांच्या घाणीतून फिरतील व मग त्यांना अ‍ॅंटिबायोटिक्स द्यावे लागेल. ( शिवाय त्यांना पकडणे व अंडी गोळा करणे जिकिरीचे होईल ते वेगळेच ! ).

कदाचित ह्या सगळ्या काथ्याकूटीचा एक रोख असा असावा की कशाची काळजी कशी करावी ह्या व्यूहामध्ये, आधी कोंबडी का आधी अंडे, ह्या व्यूहचक्रामधून सुटण्याचा एकमेव मार्ग, कोंबडी व अंडी खाणेच सोडावे, असा असावा ! थॅंक्स अमेरिका !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

the Bhalerao---10

Which first, the egg or hen ?

There are no signs that America will ever improve and simplify. Last week, we saw a recall of lot of eggs all over due to Salmanella infection and people falling sick due it.

What is America, if you can't debate the silliest issue to ones heart's desire and unto the last resort ? Newspapers are filling us up with incredible details on this world's primitive riddle," which first egg or hen ?". An NGO similar to what Maneka Gandhi runs in India, one organisation here for humane treatement to farm animals says that hen cages should be air-conditioned and should be large enough. The hen, they say, should be able to stretch inside and also turn around easily. The egg producers counter on this, that who will pay for such cages ? Moreover, see how all the hen are huddling together inspite of the spacious cages. And they also want all the rest of the world to evolve standards for spacious cages and then they will follow the same here.

Some animal lovers go so further as to plead total freedom for hen in the open ( with no cages ). The egg producers have problem on this that the hen will then run into each other's feces and will have to be treated with anti-biotics and this will be more expensive. And of course the egg collection will be quite a task in such a free environment !

Perhaps there is lesson in all this discussion for America and the world apart from the age-old riddle of which first, the egg or the hen ? and that could be that don't eat eggs or hen !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Monday, August 9, 2010

द भालेराव---९
अनीतीचा मोह !
एच पी ह्या मोठ्ठ्या संगणक कंपनीचा मुख्याधिकारी, प्रचंड पगार, वयही झालेले, ७ मिलियन डॉलरचे घर, मोठी मोठी मुले, बरे कंपनीत तसा मानही चांगला, चांगली कर्तबगारी, आणि कोणा एका ५० वर्षाच्या बाईच्या नादी लागून सर्वस्वाचा र्‍हास करून घेतो ! हे असे का होते ? अनीतीचा एवढा कसा मोह पडतो ?

आणि हे लहानपणापासूनचे आहे. चोर-पोलीस खेळात सगळ्यांना चोरच व्हायचे असते ! हुशार, सभ्य मुलाला मुली शामळू म्हणून हिणवतात तर टग्यांबरोबर आई-वडिलांना फसवून सिनेमाला जाऊ इच्छितात. सगळे चांगले, दोरी धरल्या सन्मार्गाने चालू आहे असे म्हणताच चांगल्या चांगल्यांना अवदसा आठवते, दारूच प्यायला लागतात, किंवा घरी चांगली बायको असताना बाहेरख्यालीपणा करतात. सगळ्यांचेच कसे असे न चुकता होते ?

अगदी प्रेसिडेंट असलेल्या क्लिंटनना ऑफीसमध्ये चाळे करण्याचे काय अडले होते. नीट ठरवले असते तर ह्याही पेक्षा ज्यास्त अनीतीची कामे ते बिनबोभाट, पकडले न जाता सहजी करते पण त्यांना थ्रिल हवे असणार ! विश्वामित्राला सुद्धा हा मोह आवरता आला नाही. पुरुष आपल्या मोकाट लैंगिक कल्पना ( फॅंटसीज) एकमेकांना चढाओढीने रंगवून रंगवून सांगतात व तडीला नेण्याचा चंग बांधतात आणि मग कुठे तरी फसतात, पकडल्या जातात.

तर, ह्यावरचा उपाय, असा की जमेल त्याने मोह टाळावा किंवा निदान पकडल्या जाणार नाही अशी खबरदारी घ्यावी. कंपनीच्या खर्चानेच भानगड करायची असेल तर ती खर्चात "बिझनेस डेव्हलपमेंट किंवा लॉबीयिंग" अशा गोड सदरात घालावी ! किंवा "महिला गटास मदत" !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Arunoday Zaalaa---9
Lure of Immorality !
A CEO of a big company like HP, huge salary, a 7 million dollar house, grown up kids, an efficient career and all that goes down the drain due to some tame affair with a 50 yr old lady ! Why do men fall so cheaply ?

This curse seems to have been incurred right from childhood . In a game of thief and police, no one wants to be a catching police but a thief on the run ! A brilliant, studious straight guy in school is disliked by the girls and they fall for a cheap, bully like, cool guy ! When we see a regular careerists house with good amenities, good school for children, nice car etc., suddenly we find picture being tarnished by too much indulgence of the man in parties, drinks and the chicks !
Even the high and mijghty fall from grace with prompt regularity. If Bill Clinton had used little descretion he could have done much more sins without getting caught, that too, in office. Even the sage Vishwamitra had to fall so easily for the charms of Menaka ! Men exchange their sexual fantacies with friends and hope that they too can emulate the dreams thrown at them !
Remedy perhaps is to avoid the lure for those who can or at least, the lesson would be learnt in not getting caught ! If you must womanise, at the company's expense, at least take care to bill it in proper account heads such as "business liasion, or business development" or better still "women upliftment !"


Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Thursday, July 29, 2010

द भालेराव---८

जीव-फुंकर किंवा सीपीआर

कोणाला ह्र्दयविकाराचा झटका आला असेल तर त्याला तात्काळ करावयाचा उपचार असतो सी पी आर ( कार्डिओ पल्मोनरी रिससायटेशन ) किंवा जीव-फुंकर ( हा आपला मला आवडलेला शब्द ! ). अमेरिकेसारख्या प्रगत देशात म्हणे वर्षात ३ लाख लोकांना हॉस्पीटल बाहेत ह्रदयविकाराचे झटके येऊन मरण आले ( ह्या वर्षी ). नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार ह्यापैकी फक्त ६ टक्के वाचतात. जर ह्यांना नवीन प्रकारची जीव-फुंकर मिळाली तर त्यातले १२ टक्के लोक वाचतील असे अमेरिकन हार्ट असोसिएशनचे म्हणणे आहे. काय आहे ही नवीन प्रकारची जीव-फुंकर ?

झटका आलेल्याला प्रथम जमीनीवर आडवे झोपवावे ( अर्थात पालथे नव्हे, तोंड वर ) . छातीवर, मधोमध, एक हात ( तळवा, बोटे ह्रदयावर अंदाजे येतील असा, ) ठेवावा. दुसर्‍या हाताचा तळवा त्यावर जोर देण्यासाठी ठेवावा. मग छातीवर हाताने जोर देत दर मिनिटाला १०० भरतील इतके भरभर दाबावे. तोंडाने हवा फुंकण्याच्या भानगडीत पडू नये. ( चमकू नका. पूर्वी म्हणत की दोन वेळा पूर्ण श्वासाचे दोन फुंक द्या . पण आता असे लक्षात आले आहे की लोक हे करीत नाहीत व परिणामी छाती दाबण्याचा प्रयोगही होत नाही. तर आता नवीन आदेश हा की श्वास देण्याच्या भानगडीत पडू नका व त्याने विशेष परिणामही होत नाही असे आढळले म्हणे .).

एमर्जन्सी फोनवरून बोलणार्‍या माणसाने अगदी ठामपणे फोन करणार्‍याला ह्या सूचना द्याव्यात असेही अमेरिकन हार्ट असोसिएशनचे मत आहे.

काळाने आपली प्राण-ज्योत विझवण्याच्या आधी, चला घालूया ही नवीन जीव-फुंकर, आणीबाणीच्या वेळी !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

the Bhalerao---8
New CPR
The news is practice a new method of CPR ( Cardiio-Pulmonary-Resuscitation ) as advised by the American Heart Association. Last year 3,10,000 people died of heart attack outside the hospital. Only 6 % of the cases survive, but with new CPR they hope 12% can be made to survive. What is this new CPR ?

First let the patient lie dowin on the floor, in a head & nose up position. Place your one hand ( palm facing down, fingers covering approximately over the heart ) at the centre of the chest. Place the second hand on the first, for giving pressure down. Press release the pushes, quickly, ( as quick as giving 100 pushes per minute ) for few times. Don't bother for blowing breaths into the mouth of the patient. ( The survey found that people were not giving CPR because of perceived complication in blowing breaths in the mouth. Hence making it simple will make the CPR being administered to more patients and survival is exected to rise to 12 % from existing 6% ).

People generally phone emergency numbers in most cases and wait for help to arrive, but the person receiving such phones is advised to instruct them, focefully, to administer the new CPR, which anybody can do on clear instructions.

As it is a matter of Life and Death, let us help keep the death away by giving timely new CPR !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Thursday, July 22, 2010

द भालेराव-७
"वारसा"चे तत्व
पूर्वी वारसा हक्काने सर्व मिळकत फक्त मोठया मुलाला मिळे. तर कित्येक घरात मोठ्या मुलाला अमुक तमुक देवाला किंवा देवीला वाहून टाकत असत. शिखांमध्ये मोठया मुलाला सरदार व्हावेच लागे. मुसलमानांमध्ये माणसाला आपल्या मिळकतीचा काही भागच ( १/३) मृत्युपत्राद्वारे देता येतो. उरलेल्या २/३ भागातून नातेवाईकांना वारसाहक्काने मालमत्ता वाटतात. त्यात मुलाला दुप्पट भाग मिळतो तर मुलींना एक भाग. २००६ पासून हिंदू मुलींना समान वाटा मिळावा असा कायदा झाला आहे.मृत्युपत्र केलेले नसेल तर मालमत्ता समान भागात वाटतात.
समान भागाचे हे वारसाचे तत्व कसे व का अमलात आले असावे ?
मृत्युपत्रा प्रमाणे वाटणे हे त्या माणसाच्या मताप्रमाणे असल्याने ते अर्थातच त्याच्या मनाप्रमाणे असते.पण त्याच्या पश्चात वाटण्यासाठी काय रास्त प्रमाण असावे ? आपल्याकडे मेरिट म्हणजे मार्क, परीक्षा, असेच समजले जाते.पण एखाद्याची मालमत्ता वाटण्यासाठी काही परीक्षा असत नाही.मग कोणाला किती मार्क्स मिळतील त्याचा काही संबंधच रहात नाही. गरीबी श्रीमंतीवरून वाटण्या केल्या व श्रीमंतालाच परत ज्यास्त वाटा दिला तर ते गरीब वारसाला अन्यायाचे वाटणार.गरीब वारसाला ज्यास्त वाटा दिला तर दुसर्‍यांना ते अन्यायाचे वाटणार. जसे मृत्युपत्रात त्या माणसाची इच्छा व्यक्त केलेली असते तसे त्याच्या मृत्यू पश्चात काय योग्य हे कसे ठरवायचे ?
प्रत्येक माणसाचा दृश्य हेतू पुढे त्याच्या संततीची प्रगती व्हावी असाच असतो. कोणाची किती प्रगती होऊ शकते ह्याचे काही आडाखे आपण बांधू शकत नाही. कोणी कवी मृत्यू पावला व त्याचा अंश पुढच्या पिढीत रहावा अशी योजना करू म्हटले तर त्याच्या मुलांत कोण चांगला कवी होऊ शकतो हे पहावे लागेल.पण प्रत्यक्षात अंदाजाप्रमाणे किंवा परीक्षेप्रमाणे कोणाची प्रगती होते हे बेभरवशाचे असते. शिवाय कवी असलेल्या माणसाची धन्यता त्याची मुलेही कवी झाल्याने होते की ते डॉक्टर , इंजिनियर झाल्याने होते हे कसे व कोण ठरवणार ? एका माणसाचा डिएनए पुढच्या पिढीत काय झाल्याने प्रगत डिएनए होईल ह्याला काही अदमास नाही. मग सर्वच पुढच्या पिढीच्या डिएनए ज ना सारखे हिस्से दिले तर त्या सर्वांना सारखे प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. व मग त्यातूनच कोणा तरी वारसाचा डिएनए वाढीस लागेल व मृत्यू पावलेल्या डिएनए ला धन्य वाटेल. हेच असेल समान वारसा हक्काचे तत्व ?

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
the bhalerao

Sunday, May 23, 2010

द भालेराव-६

बदलती घरे, घरांचे बदलणे !

जे पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात त्यांना वाटते ह्या जन्मी माझा वास ह्या शरीरात आहे. त्या अगोदर कदाचित माझ्या आजोबाच्या शरीरात वास असेल, त्या अगोदर कदाचित पणजी आजीच्या शरीरात असेल. असेच असते आपले निरनिराळ्या घरा घरात राहणे.जसा जीव रमतो, त्या त्या काळच्या देहात, तसेच आपले रमणे असते, वेगवेगळ्या घरात.
पण त्या त्या वेळी वाटत असते की कैक वर्षांपासून आपण ह्याच घरात राहतो आहोत. आणि त्या त्या घराची मग आपल्याला ओढ लागून राहते.
आता घाटकोपरच्या घरातच मला वाटते मला तीस वर्षे झालीत. आता इथेच...असे वाटू लागते न लागते तोच आठवते की त्या अगोदर दहा वर्षे इथेच जवळच्या घरात गेली होती. खरे म्हणजे सर्व प्रगती, मुले, त्यांची शिक्षणे, सुबत्ता, पाहुण्या रावळ्यांची वर्दळ वगैरे ह्याच घरात नांदली होती.
पण ह्या घरा अगोदर, ह्या घराची मुहूर्तमेढ रोवली गेली होती, कालीनाच्या घरात. केवढेसे छोटे घर, पण अगदी सोईचे. खरे तर हे होते ट्रेनी इंजिनियरांचे हॉस्टेल.पण बाल्कनीला आत घेऊन स्वयंपाकघर केलेले होते. ह्या घरातच माझ्य़ा मुलीचा जन्म झालेला होता.
आणि त्या अगोदरचे डोंबिवलीचे घर तर विसरणे अशक्यच. अवघ्या दोन खोल्या, स्टेशनपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर,गावाबाहेरच्या गोठया जवळ. पाणी विहीरीचे काढावे लागे. ह्याच घरात पत्नीचे पहिले गर्भारपण झाले. आयुष्या खडतर तर होतेच पण त्यातही एक गंमत होती. बॅंकेतले पहिले खाते इथेच काढणे झाले.
पुण्यातली एरंडवण्यातली खोली तर अगदी स्वप्नवतच होती. टुमदार बंगला व वर ऍटिक सारखी खोली. एका सडया माणसापुरती असलेली ही खोली पण ह्यात भास्करराव खरवडकर एम.डी.चा अभ्यास करायला राह्यले होते,चांगले तीन महिने. रमाकांत देशपांडे, प्रकाश खरवडकर वगैरे मित्रमंडळीही वरचेवर येत असत.
त्या अगोदर सहा महिने मी सन्मित्र कॉलनीतल्या घरात होतो. लेक्चररची नोकरी कधी एकदा सोडतो व घर कधी सोडतो असे झाले होते तेव्हा. अर्थात त्या घराचा त्यात काहीच दोष नव्हता. उलट ते माझ्या वडिलांचे सगळ्यात चांगले घर होते. त्यांचे त्या अगोदरचे चौधरी बंगल्यातले घर तर एखाद्या भुलभुलैय्या सारखेच होते. गच्चीवरच्या रंगीबेरंगी आरसे महालात मॅट्रिकचा अभ्यास करायला खूपच मजा आली होती. शिवाय खादीचे कपडे प्रशस्त हौदाजवळ टिनोपालने धुताना माझी जी तंद्री लागे ती एखाद्या अध्यात्मिक ध्यानाच्या तोडीची असायची.
त्या अगोदरच्या हैद्राबादच्या काचीगुड्याच्या घरात माझे पाचवी ते नववी पर्यंतचे शिक्षण झाले होते. ह्या घराची आठवण होते तेव्हा माणसांचे प्रचंड मोठे घोळके आठवतात. पाहुणे रावळे, कार्यकर्ते, विद्यार्थी, त्यांची क्रिकेटची टीम, त्यात माझे विकेट कीपींग असे प्रचंड घाई गर्दीचे दिवस आठवतात. त्यातच टेबलाखाली बसून दिवाळी अंकांचा हस्तलिखितातला साहित्य ठेवा मी वाचीत असे, गुपचूप.
त्या अगोदरचे प्राथमिक शिक्षणा दरम्यान घर होते सुलतान बाजारात. पारगावकरांच्या शेजारी. इथून शाळा अगदी जवळ असल्याने, शाळा सुटल्यानंतर मोकळ्या शाळेत खेळण्याचा अनोखा आनंद मला मिळाला. ह्या घराचा उंचच उंच जिना व त्यावरूनचे घसरणे मला चांगलेच आठवते. त्या अगोदरचे घर होते गामजी बिल्डींग मधले. पंधरा वीस बिर्‍हाडं एका बंगल्यात असलेली ही वास्तू. हीत अगदी अनोखी बाब होती, ती म्हणजे कम्यनिटी संडास. दहा पंधरा जणं, एकदम बसतील असा एवढा मोठा चराचा संडास.
त्या अगोदरचे आठवणारे घर म्हणजे आजोबांचे खंडाळ्याचे. प्रचंड मोठा वाडा. प्रवेशालाच एक धनगर जोडपे राखणदारासारखे रहात असे. त्यांचे लग्नही मला चांगले आठवते. माझी आजी चिंध्यांचा चेंडू करायची व माझे काका लोक त्याने धप्पाकुट्टी नावाचा खेळ खेळत. आजोबांच्या भजनाला आलेली मंडळी एकत्र परातीने चहा पीत असत.
अबब ! नुसती आठवणारी घरे वरची मोजली तर भरतील,बारा. आणि शिवाय पुण्याला माझी आत्ताची दोन घरे मोजली तर भरतील तेरा. आणि जनरीती प्रमाणे एक दिवस ही सगळी घरे सोडून मला जावे तर लागणारच आहे. मी कितीही कोणत्या घराबद्दल ममत्व जपले तरी !

अरूण अनंत भालेराव
९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

Saturday, April 24, 2010

द भालेराव : ५
गोड साक्षात्कार !
मला नुकतीच शुगर निघाली आणि एक गोड साक्षात्कारच झाला !
प्रत्येक माणसात देवाचा अंश असतोच, असे म्हणतात, तसा प्रत्येक माणसात शुगर असतेच हे मात्र आता मला स्वानुभावाने कळले.
बाहेरून साखरेच्या असण्याचे काही प्रमाण दिसत नाही, पण तपासले तर प्रत्येकात देव आढळतोच तशी थोडी वा फार साखर निघतेच निघते.
एकदा का हा दैवी साक्षात्कार झाला की मग गोडी कमी झाली तर चालत नाही. म्हणजे शुगर कमी झाली की चक्कर येते तसेच देवाची गोडी कमी झाली की नाही नाही त्या फेर्‍यात (चक्करेत) माणूस पडतो.
शुगर निघाली रे निघाली की फिरणे अगदी अत्यावश्यक होते. कारण देतात, अतिरिक्त गोडी जाळण्याचे. देवाचा साक्षात्कार झाला की असेच होते. बसून न राहता सगळीकडे मिरवावे लागते.
शुगर निघाली की आपण जे एरव्ही बका बका खातो ते थांबते. कशात किती साखर आहे हे पाहणे अगदी चौकस होते. प्रत्येक पदार्थात आपण काय चांगले काय वाईट ते बघू लागतो. देवाचा साक्षात्कार झाला की सगळीकडे पाहण्य़ाची नजर अशीच विवेकाची ठेवावी लागते. कोण चांगला आहे, सत्संग कोणता, हे पाहत जगावे लागते.
जेवणानंतरची शुगर ज्यास्त असते तर सकाळी फास्टींगची कमी असते. म्हणजे साखर कमी असावी तर उपास घडला पाहिजे. ह्याच नियमावरून देवासाठी उपास तापास करण्याची परंपरा तयार झाली असावी.
देवाचा अंश आपल्यात आला की आपण कसे देवमय होऊन जातो, देवात विलीन होतो तसाच काहीसा संकेत शुगर येण्याचा असतो. म्हणजे आता शुगर आलीय तर पर्याणाचा अंतिम दिवस, गोड शेवट, फार लांब नाही हाच तो संकेत !

--अरूण भालेराव
भ्रमण :९३२४६८२७९२

Tuesday, April 13, 2010

:द भालेराव : ४

आयेशा, लई भारी !
सर्व सौंदर्यशास्त्राचा पचका करीत, सुंदर सानियाचा पार चुराडा केलाय आयेशा आपाने ! शोएबला तर तिने चिमटूनच टाकले आहे. आता म्हणे आयेशाचा भाव खूपच वधारला आहे. साहजिकच आहे. तिचे वजन असेल, १५० किलो. आणि तिला देऊ केलेत १५ कोटी रुपये, म्हणजे, गेला बाजार, भाव पडतो, दहा लाख रुपये किलो ! सर्व साधारण बाई-माणसांसारखे तिने डाएटिंग वगैरे केले नाही ते बरेच झाले म्हणायचे. अजून एक बरे झाले की आयेशा किंवा शोएब बंगाली नाही झाले. नाही तर बंगाली वराला लग्नात बधूला उचलावे लागते ते अशक्यच झाले असते !
खरी लग्नामागची बातमी शरद पवारांनी गुलदस्त्यात ठेवली होती. अजूनही ती तशी बाहेर आलेली नाहीय.
पण तुम्ही आपल्यातलेच म्हणून सांगायला हरकत नाही की शोनिया ह्यांनी एक क्रिकेट टीम आयपीएल मध्ये विकत घेतली आहे. ह्यांचे स्टेडीयम दुबईला राहणार असून ते क्रिकेटचा खेळ टेनिसच्या नियमांनुसार खेळणार आहेत. ते असे :
१) फर्स्ट सर्व जशी नेटला घसटून गेली तर परत री-सर्व करतात, तसे पहिला बॉल स्टंप्स्ना घसटून गेला तर तो परत टाकावा लागेल.
२)असे दोनदा घडले तर तो बोलरचा "डबल फॉल्ट" धरण्यात येईल.
३) समजा पहिला पॉइंट तुमचा गेला ( म्हणजे पहिल्या बॉलवर रन नाही मिळाला ) व प्रतिपक्षालाही असेच झाले तर "लव्ह ऑल" असे घोषित करण्यात येईल व कोर्टवर हजर असलेल्या पैकी सगळ्यात वजनदार व्यक्तीला प्राईझ-मनी द्यावा लागेल.
४) लग्नाआधी शोएबला जसा डायव्होर्स घ्यावा लागला तसा प्रत्येक खेळाडूला टीमपासून डायव्होर्स घ्यावा लागेल.
५) मॅच ठरलेल्या तारखेच्या आधीच होईल.
६) मॅच झाल्यावर प्रत्येक खेळाडूला आपला देश सोडून दुसर्‍या देशात स्थलांतर करावे लागेल.
७) मॅच दरम्य़ान फक्त बिर्याणी देण्यात येईल.

अरूण अनंत भालेराव
भ्रमण : ९३२४६८२७९२

Friday, March 5, 2010

मौखिक परंपरेचे मुख !
तुकाराम महाराजांच्या काळी जो वारकरी संप्रदाय होता,त्याची म्हणतात मौखिक परंपरा होती. म्हणजे जे काही संप्रदायाचे ज्ञान, नियम, रीती-रिवाज होते,ते कुठे लिखित स्वरूपात नव्हते तर सर्व तोंडी होते. जसे भजन, कीर्तन वगैरे सर्व मुखाने म्हणण्याचे प्रकार होते. अशी ही मौखिक परंपरा.
त्याच वेळी दुसरा एक महानुभावी संप्रदाय होता. तो वारकर्‍यांपेक्षा प्रगत होता.पण त्यांचे साहित्य,नियम,रूढी वगैरे सर्व मोडी लिपीत लिखित स्वरूपात होते.ह्या कठिण प्रकारापायी हा संप्रदाय लवकर लयाला गेला. मौखिक परंपरेमुळे वारकरी संप्रदाय बराच टिकला, वाढला.
आपल्याला वाटते, आज जग किती पुढे गेले आहे,सगळे कसे नीट,संगतवार लिहून ठेवलेले असते. मोठमोठे करार व्यवस्थित कलमे घालून लिहून ठेवलेल्या बाडातून असतात. सगळ्यात मोठ्ठा करार कोणता ? " आय डू " किंवा "शुभ लग्न सावधान" म्हणून होणारे लग्न ! का हा मोठ्ठा करार ? कारण ह्या करारान्वये संतती निर्माण करीत लोक एक नवीन पीढी तयार करतात. ह्यापेक्षा मोठी निर्मिती ती काय ? आणि कसा असतो हा करार ? तोंडी ! आणि त्याला कायद्याच्या सर्व बाबी लागू होतात. चालू आहे ना मौखिक परंपरा !
वीस पंचवीस वर्षापूर्वी शेअर बाजार,सट्टे बाजार हे सर्व तोंडी चालत. खूप दाटी होई. दलालांना लटकण्यासाठी बस मध्ये असतात तसे चामड्याचे पट्टे असत. मोठ्ठ्याने ओरडत, खाणाखुणा करीत हे सर्व चाले.मोठ मोठे लिलाव कसे होतात ? ( आयपीएल चा लिलाव आठवा ) बोली तोंडी लावावी लागते. लिलाव करणारा म्हणतो, दस लाख एक बार, दस लाख दो बार, दस लाख तीन बार, सोल्ड ! खल्लास इकडचा बंगला तिकडे ! निवडणुकींचे,क्रिकेटचे,सट्टे फोन वरून, तोंडीच असतात.
प्रत्येक माणूस भाषा शिकतो तो आईच्या तोंडून आपल्या तोंडी, मौखिक परंपरेने. गाणी तर बोलून चालून सगळा तोंडी मामला. हुशार मुलाला शिकवाल ते तोंडपाठ असते.पूर्वी परीक्षाही तोंडी असत. अजूनही डॉक्टरीची अवघड परीक्षा तोंडीच असते. पीएचडीचे डिफेन्स नावाचे भाषण व प्रश्नोत्तरे तोंडीच असतात. ग्रेट ग्रेट गुरू, लेक्चर्स देतात तोंडी. निवडणुका जिंकल्या जातात तोंडी भाषणांनी. देश चालवल्या जातो, लोकसभेत, तोंडी. माणसाचे सर्व महत्वाचे व्यवहार, जसे, शिक्षण, प्रेम, संसार, गुजगोष्टी, आरडाओरडा, त्रागा, आवाहने, आव्हाने,ऑफिसातल्या मीटींग्ज, रस्त्यावरची गजबज, मुलांचे संगोपन, नातेवाईकांशी संवाद, वगैरे ,तोंडीच होतात. म्हणजे मौखिक परंपरा आपण अजून पाळतोय तर !
आयटी ( संगणक ) युगामुळे सगळे संगणकाच्या भाषेत सांगितले तरच लवकर कळते. मौखिक परंपरा किती महत्वाची माहीती आहे ? अहो संगणकात सगळ्यात मोठी फाईल साऊंड बाइट्सचीच होते. म्हणजे मौखिक परंपराच ग्रेट !
---अरुण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२

Thursday, March 4, 2010

काँग्रेसची पोरं लई हुशार !
हुशारी ही एखाद्या संस्थेकडे असतेच की हुशार माणसे त्या संस्थेत आल्याने त्या संस्था हुशार होतात हा संशोधनाचा विषय असावा. पण इतक्या वर्षांपासून काँग्रेस पक्ष सत्ता कब्जात ठेवून आहे की सत्तेला काय लागते व काय चालते हे ते चांगले जाणतात. कसे ते पहा.
शरद पवारांवर अगदी पोरासोरांनी ह्या एक दोन महिन्यात तोंडसुख घेतले. मागे पवार म्हणत की पाऊस पडला नाही तरी त्याला शरद पवारांना दोषी धरायचे , ह्या नीतीला धरून महागाईला तेच आणि तेच कसे जबाबदार आहेत ह्याचा सगळ्यांनी गळा काढला. काहींना वाटले आता साहेबांचे दिवस भरले, आता काही ते रहात नाहीत. साहेबांनीही निर्यातीचा निर्णय कसा माझा नव्हता, तुमचा होता, व त्याने साखर महागली वगैरे भाषा सुरू केली आणि काँग्रेसला भान आले. त्यांना साक्षात्कार झाला की आपल्याला कोणाचा दोष काढण्यापेक्षा सत्तेला सुरुंग लागणार नाही हे पाहणे महत्वाचे आहे.
मग त्यांनी काय केले, बजेट मध्ये पे‍ट्रोल व डीझेलचा भाव वाढवला. ह्याने झाले काय की महागाई खरेच वाढली तर ती इंधन-भाववाढी मुळे वाढली असे झाले. पवारांचे कारण आता झाकले गेले. इंधन भाववाढ काय एकदोन वेळा करावीच लागते आणि ती सगळ्यांच्याच परिचयाची आहे. एक प्रकारे तिला जनतेची माफीच आहे. आणि आता बजेटच्या वेळी नड कशाची आहे तर जीडीपी ची घोडदौड दाखवायची. शिवाय जीडीपी चा काय आकडा काढायचा ते तर तद्दन आपल्या अखत्यारीतील बाब आहे. हा आकडा कसा काढतात, तो कसा लाख कोटीत आहे, हे कोणा लेकाला कळते ? कळलेच नाही तर त्याविरुद्ध बोलणार तरी कोण ? तर सत्ता अशी अबाधित !
पवारांना असं कव्हर केल्यावर ते कशाला काय बोलतील ?
काँग्रेसची पोरं अशी हुशार !

---अरूण अनंत भालेराव

Wednesday, March 3, 2010

ईतुका सकल संपूर्ण !
तुकाराम महाराज जर संगणकावर अवतरले तर आपल्याला त्यांना ई-तुका म्हणावे लागेल. पण फरक इतुकाच राहणार नाही तर बरेच नवे काही संगणक आपल्याला सांगेल.
संगणकाचे युग हे वेगाचे युग असते. संगणकावर लिहिण्याचा वेग, तो अपलोड होण्याचा वेग, तुकारामाचे अभंग डाऊनलोड करण्याचा वेग, असे सगळे वेगवान जग, प्रथम मोजते तो वेगच ! तुकाराम महाराजांना सगळ्यात अप्रूप कशाचे होते तर ते शब्दांचे. म्हणूनच ते म्हणाले होते : "आम्हा घरी धन, शब्दाची च रत्ने । शब्दाचीच शस्त्रे, यत्न करू ॥ शब्द चि आमुच्या, जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन, जनलोका ॥ तुका म्हणे पाहा, शब्द चि हा देव । शब्दे चि गौरव, पूजा करू ॥" तुकाराम महारांच्या गाथेचे देहू प्रत, जोग प्रत, शासकीय प्रत वगैरे अनेक प्रती आहेत. पैकी देहू प्रत संगणकावर उपलब्ध असून ती तुकाराम.कॉम ह्या वेबसाईटवर ही पाहता येते. तुकाराम महाराजांच्या ह्या गाथेत एकूण ४५८३ अभंग आहेत. आता इतक्या प्रचंड गाथेत एकूण शब्द किती असतील बरे ? प्रत्यक्ष पुस्तकात (हार्ड कॉपी) एकेका पानावर शब्द मोजायचे म्हणजे फार जिकीरीचे काम. शिवाय संगणक युगात असं मोजत बसलं तर हसं होईल ते होईलच. संगणकाकडूनच एकूण शब्द मोजता आले तर मात्र ते आधुनिक वाटेल. तर ही प्रत वर्ड हया प्रकारात उघडून त्यातल्या वर्ड-काऊंट सवलतीचा उपयोग केला तर? करून पाहिले तर एकूण शब्द गाथेत निघाले : दोन लाख,तीन हजार आणि सातशे पन्नास ( २,०३,७५० शब्द ). संगणकावर फार विश्वास टाकता येत नाही. कधी कधी आपल्या चुकीने चुकीचे उत्तरही येऊ शकते. म्हणतातच की संगणक म्हणजे गार्बेज इन गार्बेज आऊट ( कचरा आत तर कचरा बाहेर ! ). मग ह्याचा प्रत्यक्ष प्रतीतल्या (हार्ड कॉपी) एका पानावरचे शब्द मोजले तर ते निघाले :२१५ व अशी पाने भरली ९५५. म्हणजे अंदाजे शब्द २,०५,३२५. हे संगणकाच्या वर्ड-काऊंटच्या २,०३,७५० शब्दांच्या बरेच जवळचे आहे म्हणून बरोबर असणार. आता तुकाराम महाराजांनी हे सर्व शब्द वयाच्या ४२ व्या वर्षापर्यंत लिहिलेले आहेत. साधारण विसाव्या वर्षी त्यांचे कवित्व सुरू झाले असेल असा अंदाज धरला तर २२ वर्षांचा सर्जनशील कालखंड मिळतो. भागाकार केल्यावर हे भरतात दिवसाकाठी २५ शब्द !
दिवसाकाठी २५ शब्द हा वेग प्रचंड का खूप कमी हे आता पाहू या. मागच्या वर्षी महाराष्ट्र-काव्य भूषण हा किताब मिळालेले बहु-प्रसव कवी मंगेश पाडगावकर यांचा वेग तुलना करण्यासाठी बघू. मंगेश पाडगावकरांचे समग्र साहित्य तसे त्यांच्या प्रकाशकांकडे संगणकावर उपलब्ध असणार. पण ते आपण थोड्याशा अदमासाने ताडू शकतो. त्यांच्या "गिरकी" ह्या काव्यसंग्रहात एकूण शब्द आहेत ८,८००. त्यांचे अशी एकूण पुस्तके आहेत:४५ (शेवटच्या "शब्द" पर्यंत ). तर त्यांची एकूण शब्दसंपदा भरेल अंदाजे: ४५*८८००=३,९६,००० शब्द ! आणि त्यांनी हे सर्व उभे केले वयाच्या २० व्या वर्षापासून आत्ताच्या ८२ व्या वर्षापर्यंत म्हणजे एकूण ६२ वर्षात. मग हा वेग भरतो दिवसाकाठी १७ शब्द ! सध्याच्या युगातले अगदी हातखंडा चपखल शब्द देणारे कवी सराव करतात दिवसाकाठी १७ शब्दांचा, तर ईतुका त्यांच्या दीडपट ! कवी मंगेश पाडगावकरांना ह्या तुलनेचा राग येणार नाही हे तर नक्कीच पण इथे तुकाराम महाराजांच्या प्रचंड प्रतिभेचे दर्शन घडते आणि ईतुका आकाशाएवढा हे सप्रमाण पहायला मिळते ! अगदी त्यांच्याच शब्दात " सकल संपूर्ण गगन जैसे ! "
अरुण अनंत भालेराव , १८६ / ए -१ , रतन पलेस ,गरोदियानगर ,घाटकोपर (पूर्व ) मुंबई -४०००७७ टेलिफोन : ९३२४६८२७९२

Thursday, January 14, 2010

The Greatest Trade Ever--by Gregory Zukerman
This book recently written by one of columnists of Wall Street Journal is an interesting read. It also reveals the faultlines in the American Banking System and lack of common sense regulation. If the bankers are lending with confidence to sub-prime companies then how come they also issue insurance for default covers and make money on it at the cost of failure of the sub-prime companies.